माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:
कुणी नुसतं "काय होतंय तुला?" विचारावं आणि बांध फ़ुटावा अशी मनाची अवस्था फ़ार विचित्र असते. नक्की काय बिनसलंय कळत नाही. असं कधीपासुन होतंय आठवत नाही. हे सगळं असंच चालु राहिल, असं नसतं पण आत्ता या क्षणी ते कळत नाही. असं वाटत की ही सगळं काही थांबल्याची जाणीव अशीच पाठी लागणार. आता यातुन सुटका नाही.