प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांना धन्यवाद. सई ह्यांनी दिलेलं उदहरण अगदी बोलकं आहे.

आत्ताच्या काळात अति विरोध किंवा खडखडाट न होताही हे जमणं शक्य आहे असं वाटतं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडं गोड गोड किंवा गुळमट वाटलंही असेल, किंवा विरोध करणारी पात्रं रंगवली असती तर एकूणातच कथेची रंगत वाढू शकली असती हे ही पटण्यासारखे आहे.

दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटतात :

जे पुनर्विवाह करत आहेत त्यांना ही जाणीव हवी की, नव्या माणसाशी जमवून घेताना तडजोडीं कराव्या लागतील, तुलना होईल, मतभेदांमुळे चिडचिड, ताणही जाणवेल कदाचित पण त्यापेक्षाही आपल्या माणसाची साथ असणं खूपच जास्त महत्त्वाचं आहे.
आणि
जवळच्या नातेवाईकांनीही ही जाणेव हवी की आपल्याला काय वाटत आहे किंवा समाजात हे प्रचलित आहे की नाही ह्यापेक्षाशी आपल्या माणसाचं एकटेपणामुळे आलेलं दुःख दूर होणं हे जास्त महत्त्वाचं आहे.

ह्या कथेतल्या पात्रांच्या बाबतीत दोन्ही गोष्टी होत्या म्हणून सगळं सुखाचं झालं.