मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग वगैरे गोष्टींची काळजी आता न केलेलीच बरी. त्याने फारसा फरक पडणार नाही. मुंबईची परिस्थिती पुरेशी वाईट आहे आणि यापेक्षा वाईट परिस्थिती होणार नाही असे वाटते. (उसकू दवा की नही दुवा की जरुरत हय) याउलट हातातून जवळजवळ निसटलेली पुणे-नाशिक-नागपूर आणि आता सुपात असलेली पण उद्या जात्यात जाणारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद वगैरे शहरे व त्यांच्या आसपासच्या गावांचे मराठीपण जपण्याचा प्रयत्न करावा.
मुंबईबाबतच्या कोल्हेकुईवर दत्तप्रसाद दाभोळकर यांचे २१ ऑगस्ट रोजी लोकसत्तामध्ये आलेले पत्र विचार करण्याजोगे आहे.
शाळा-कॉलेजात असताना एका बेहोशीत आम्ही ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ असे म्हणत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सामील झालो. आज मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातील धोंड आहे का, या प्रश्नावर शांत मनाने विचार करण्याची गरज आहे.याच विषयावर अधिक मत येथे वाचायला मिळेल
मुंबईतील जवळजवळ सर्व छोटे-मोठे उद्योगधंदे अन्य भाषकांच्या मालकीचे आहेत. तेथे नोकऱ्या करणारी माणसेही प्रश्नमुख्याने परभाषक आहे. महाराष्ट्रातील विद्युत उत्पादन केंद्रामधून त्यांना २४ तास हवी तेवढी वीज मिळते. मात्र नाशिक, सातारा, कोल्हापूर आदी सर्व जिल्ह्यांत एमआयडीसीमधील कारखाने मराठी भाषकांचे असताना व तेथे प्रश्नमुख्याने मराठी माणसे नोकरीला असताना, त्यांना वीज पुरवली जात नाही. मराठी उद्योजक खच्ची होतात आणि मराठी कामगार बेकार. खेडय़ापाडय़ातील शेतकऱ्यांना वीज मिळत नाही. आमचे अन्नधान्याचे उत्पादन घटते, शेतकरी कर्जबाजारी होतात आणि बहुसंख्येने परभाषक जेथे राहतात त्या मुंबईच्या रस्त्यांवर कायम विजेची रोषणाई असते.
पाणी महाराष्ट्राचे. पण ते भरभरून पुरवले जाते मुंबईलाच. मुंबईला मिळणारे दरडोई पाणी, महाराष्ट्रात इतर कोणत्याही शहरात मिळणाऱ्या दरडोई पाण्यापेक्षा जास्त आहे. ही क्रूर चेष्टा येथेच थांबत नाही. सातारा शहरात पाणी १० रुपये हजार लिटर या दराने ग्राहकांना मिळते. मुंबईत मात्र ते यापेक्षा फार स्वस्त दरात ग्राहकांना दिले जाते. महाराष्ट्रात सर्व शहरांत एकाच दराने पाणी मिळावयास नको का? महाराष्ट्रातील एमआयडीसीमधील उद्योगधंदे व शेती यांना २४ तास वीज मिळावयास नको का? किमानपक्षी त्यांना जेवढा वेळ आपण महाराष्ट्राची वीज देतो तेवढाच वेळ ती मुंबईला द्यावयास नको का?
खरे तर मुंबईतील मराठी माणसांनी, त्यांचे महाराष्ट्रावर प्रेम असेल तर अशी चळवळ हातात घ्यावयास हवी. पण तसे काही घडेल असे वाटत नाही. कारण मराठी माणसांच्या नावाने उठता-बसता डरकाळ्या फोडणाऱ्या शिवसेनेचे, महाराष्ट्रात व मुंबईत राज्य असतानासुद्धा सातत्याने मुंबईतील मराठी माणसांची टक्केवारी कमी होत गेली. त्यांच्याच कालखंडात परप्रश्नंतीयांच्या नव्हे तर बांगलादेशीयांच्या झोपडपट्टय़ा साथीच्या रोगासारख्या मुंबईभर वाढल्या आणि मराठी बोलताही न येणाऱ्या परभाषकांना त्यांनी महाराष्ट्राचे खासदार म्हणून राज्यसभेत पाठवले! आज मराठी माणसांच्या नावाने उभे राहणारे नेते त्या वेळी शिवसेनेतच होते- त्यांनी शिवसेना त्यानंतर सोडली आणि सोडली ती व्यक्तिगत कारणे पुढे करून! या महापापाचे प्रश्नयश्चित्त म्हणून नव्हे!
खरी गोष्ट अशी आहे की, शिवसेनेने म्हटले होते तसे मुंबईकर हा प्रथम व शेवटी ‘मुंबई’कर असतो. मुंबईत राहतात त्याहून अनेक पटींनी अधिक मराठी माणसे मुंबईबाहेर महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर भारतभर राहतात. ‘राडा संस्कृती’ या ‘मुंबईकर’ मराठी माणसांनी पुढे आणली. ज्या वेळी ही मुंबईकर मराठी माणसे राडा करतात त्या वेळी ‘राडा करणारा भाषिक विभाग’ म्हणून सारा महाराष्ट्र बदनाम होतो आणि मोठय़ा संख्येने भारतभर विखरून राहणाऱ्या मराठी माणसांचे जगणे कठीण होते.
हे एवढय़ावरच थांबत नाही. मुंबईत भूखंडप्रकरणे, खंडणी यांतून अमाप पैसा मिळवलेले नेते पैशाच्या जोरावर गावोगावच्या स्थानिक नेत्यांना खिशात घालून ही मंडळी मग महाराष्ट्रावर हवे तसे राज्य करतात.
दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा