मनोगतच्या सभासदांची संख्या वीस हजारांच्या आसपास असावी असा अंदाज आहे. पण त्यामानानी लेखन फारसं होताना दिसत नाही. निदान सुरवातीला ज्या प्रमाणात लेखन होत असे त्या प्रमाणात अलीकडे लेखन होताना दिसत नाही. 'उपक्रम'वरही हीच परिस्थिती आहे. त्याबाबतची आकडेवारी मी उपक्रमवरील एका लेखात सादर केली होती. 'मनोगत'च्या लेखनसूचीत आणखी काही तपशील असता तर त्याबाबतही आकडेवारी देता आली असती.
मुळात लेखनच कमी होत असल्यामुळे त्यावर बंधनं घालून लेखन आणखी कमी होईल म्हणून सध्या त्याचा विचार करू नये असं वाटतं.
लिहिणाऱ्या प्रत्येकाला आपलं लेखन किती लोकांपर्यंत पोचलंय याबद्दल उत्सुकता असते. मनोगतवर फक्त प्रतिसादांच्या संख्येवरून याचं अनुमान काढावं लागतं. प्रतिसादांच्या संख्येबरोबर वाचनसंख्या दिली तर ते लिहिणाराचा उत्साह द्विगुणित करील असं वाटतं.
मानस६ यांचा मुद्दा गुणवत्तेचा आहे आणि मी संख्येचा मुद्दा मांडतोय याची मला जाणीव आहे. पण मुळात लेखन जितकं ज्यास्त होईल तितकं चांगलं लेखनही अधिक प्रमाणात होईल असं वाटतं.