शाम भागवतांशी सहमत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी जनमानसात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतवले जे आज तीनशे वर्षांनंतर या-ना-त्या प्रकारे जागृत आहे. म्हणूनच "शिवरायाचा घुमे पवाडा, तुटे छातीचा बंऽद" असे होते.

अंगीकृत कार्यावरची नितांत निष्ठा. ही निष्ठा नाती जाणत नाही. भीती जाणत नाही. मार्ग मिळेपर्यंत खटपट करायला बळ देते. आणि शेवटी मार्गही मिळवून देते. यामुळेच अनेक अशक्य वाटाव्या अशा गोष्टी त्यांच्या जीवनात घडलेल्या दिसून येतात. त्यासाठी स्वतःपेक्षाही अंगीकृत कार्यावर आपले प्रेम असले पाहिजे.

१६ आणे सहमत. सध्या अमेरीकेचा स्वातंत्र्यलढा वाचतो आहे. त्यातही असेच काहीसे दिसून येते.