१, २, ४, ५ व ७ या शेरात 'प्रत्येक मिसऱ्यातील अर्धेच हिरण्यकेशी' घेतले तरी अर्थ तोच राहूनही गजल तंत्रात बसेल. रदीफ घेण्याचे काही खास कारण?
सुखाविना मी सुखी असावे
असूनसुद्धा उदास; गावे
कळेल गीता; सुचेल ओवी ( यात 'कळेल' हे कळेल तेव्हा कळेल असे ! )
निदान भिंतीस चालवावे
अजून मी खोल खोल जावे
अजून आकाश उंच न्यावे
जरी तुझा राग येत गेला
तुला न काहीच मी म्हणावे
असू नये मी मनी कुणाच्या
कधी तरी हे मला जमावे
१६ मात्रा 'डिस्पेन्सिबल' का असाव्यात?
कुठल्याही पुर्वग्रहाविना....
-सविनय
'बेफिकीर'!