इतरांची कवीता वाचणे याचा कवी असण्यापेक्षा रसिक असण्याशी संबंध आहे.
कवीने रसिक असावे ही अपेक्षा आपण त्या बसमध्ये भेटलेल्या कवीकडून ठेवली होतीत काय? तसे असेल तर 'कुणाचीही कविता वाचली नाही' हे त्याचे विधान विचित्र नसून आपली अपेक्षाच मला जरा अग्राह्य वाटत आहे. कवीने रसिक असलेच पाहिजे असे काही नाही. कवी हा कवी असतो. तो रसिक असू शकतो, पण असलाच पाहिजे असे नाही. तुकारामांनी आपले काव्य लिहिले तेव्हा त्यांना 'आपण ज्ञानेश्वर वाचले आहेत काय' असा प्रश्न कुणीही विचारला नाही.
इतरांकडून रसिकतेची अपेक्षा धरणार्या (धरत नसाल तर काव्य प्रसिद्ध
करण्याच्या किंवा कुणाला ऐकवण्याच्य फंदात पडू नका) कविकडून तो स्वतःही
रसिक असावा ही अपेक्षा धरणे अगदीच चूक नाही.
मी इतरांकडून जरूर रसिकतेची अपेक्षा धरतो, पण त्यावेळी 'आपल्याला जास्त चांगले काव्य लिहायला पाहिजे' असा विचार माझ्या मनात असतो. चार जणांना प्रतिसाद दिले की तेही आपल्याला प्रतिसाद देतील असा विचार नसतो. तसेच, रसिकतेने वाचण्यालायक कविता मला या स्थळावर फारशा दिसत नाहीत. याची अनेक कारणे आहेत. 'मुक्तछंद' हे त्यातील सर्वात महत्त्वाचे कारण! कवी स्वतः रसिक असावा ही अपेक्षा धरणे 'अगदीच' चूक नाही या आपल्या मताशी सहमत आहे.
मुळात कवी असणे हीच एक
वृत्ती आहे.
हे सांगीतलेत याबद्दल आभारी आहे. :-))
आणि आपल्या मनातील कल्पना इतरांना समजतील अश्या प्रकारे, गेय
स्वरुपात मांडण्याची क्षमता/वृत्ती असणार्यांना कवी म्हणण्याची या मर्त्य
जगात पद्धत आहे.
नाही. आपली 'कशाला कविता म्हणावे' याबाबतची मते पटली नाहीत. आपण फक्त 'कल्पना पद्यात मांडण्याच्या क्षमतेला' कवीवृत्ती मानता असे दिसते. कवितेमध्ये पद्याबरोबरच काव्यही असायला पाहिजे. हे विधान नवलकारक वाटणे साहजिक आहे. पण हेमाचे नृत्य, लताचे गीत, गावसकरची तंत्रशुद्ध फलंदाजी, डोंबाऱ्याच्या मुलीने तारेवर चालणे या सर्व गोष्टी काव्यात्मक आहेत. त्या काव्य आहेत. पण त्या 'पद्य' पद्धतीने जगासमोर आविष्कृत होत नाहीत. त्या गोष्टी त्या त्या क्षेत्रातील पद्धतीप्रमाणे मांडल्या जातात. उदाहरणार्थ, 'गावसकरच्या फलंदाजीचे पद्यात्मक वर्णन आवडणार नाही, पण फलंदाजी बघताना त्यातील काव्य समजेल'. तेव्हा, 'पद्यात्मक रीतीने काव्य मांडणे' म्हणजे कविता व तसे करावेसे 'नैसर्गीकरीत्याच वाटणे व सतत वाटत राहणे' ही कवीवृत्ती आहे.
गद्य लिहून त्यालाच कवीता म्हणणे हे एक टोक, आणि कसेही
करून प्राचीला गच्ची जुळवणे हे दुसरे. चांगला कवी या दोहोंच्या मध्ये
कुठेतरी असावा.
माझ्यामते नाही. चांगला कवी म्हणजे तो जो पद्यरुपात काव्य मांडतो, मांडू शकतो व सतत मांडत राहण्याची वृत्ती व क्षमता नैसर्गीकरीत्याच बाळगतो.
एखाद्या चांगल्या कवीला वृत्त वगैरेचा फारसा विचार न
करताही स्फुरणारी कवीता एखाद्या वृत्तात बसणारी असू शकेल.
होय. फक्त, वृत्त उच्चाराप्रमाणे मान्य करायचे की मात्रांप्रमाणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
एक प्रश्नः
चांगला गायक होण्यासाठी संगीत हे कानातून रोमारोमात झिरपावे/भिनावे लागते.
उपजत प्रतिभेबरोबरच योग्य शिक्षण आणि सराव फार आवश्यक असतो. त्याच
प्रमाणे, चांगला कवी होण्यासाठी उपजत प्रतिभेबरोबर, शिक्षण म्हणून इतर
कवींच्या कवीता वाचण्याने फायदा होत असेल का?
माझ्यामते नाही. कवी ज्या दर्जाचा असतो त्याच दर्जाचा शेवटपर्यंत राहतो. याचे कारण प्रतिभा सुधारता किंवा उंचावता येत नाही.