मेहनत, तत्त्वज्ञान यात किरकोळ त्रूटी आहेत. (आपण 'गजल' या सदरात दिली आहेत म्हणून हे लिहीत आहे. )

गडकरी व तुझ्या शब्दातले काटे हे शेर आवडले. तुझ्या शब्दातले काटे फारच सुरेख ओळ आहे. मनापासून अभिनंदन!

एकंदर तत्वज्ञानात्मक आशय असलेली रचना आहे. याचा अर्थ असा की यात 'मिलिंद फणसे' ही व्यक्ती अजिबातच दिसत नाही. 'आपण ज्यात अजिबात नाही' ती  कविता गजल होणे अवघड आहे. (आता हा नवा सिद्धांत वगैरे नाही, त्यामुळे बेफिकीरीने बोलत आहे. ) 'गजल'मध्ये आपण काही प्रमाणात दिसलो पाहिजेत. ( याच कायद्यानुसार माझी 'टाकुनी लेंड्या खताला' ही रचना गजल होऊ शकत नाही, पण मी तसे तेथील प्रतिसादात म्हंटलेले नाही. मात्र, त्यात माझी वृत्ती मात्र दिसते.) उगाच काहीतरी बोलायचे म्हणून नाही, पण आपण श्री. प्रदीप कुलकर्णीसाहेबांच्या गजला वाचताच. त्यात 'एक माणूस' दिसतो जो वाचकाला 'प्रदीप कुलकर्णी' वाटावा. अर्थात, ते संपूर्ण काव्य 'आपल्यावर' करतात असे म्हणायचे नसून त्यात 'कवी' हा माणूस कसा आहे व त्याच्या अनुभुती काय काय आहेत याचा वाचकाला आपल्या आपल्या मताप्रमाणे फील सहज घेता येतो. 

गजलेतून कवी जाणवायला हवा असे वाटते. आपल्या या रचनेत 'आपण एकंदर समाजाबाबत आपल्याला जाणवलेल्या बाबींवर भाष्य करत आहात' असे आपण जरूर म्हणू शकता. मात्र, ते संवादात्मक व्हायच्या ऐवजी वर्णनात्मक झाले आहे असे वाटते.

माफी!

-बेफ़िकीर!