Marathi blog येथे हे वाचायला मिळाले:
गुंता निर्माण करण्यात काहीजणांचा मोठाच हातखंडा असतो. साध-सरळ काही चाललय, आत हे क्षण मजेत घालवू, जगण्याचा जरा वेगळाही विचार करु, थोडी वेगळी पायवाट चालु, असा विचार करण्याचा विसाव्याचा क्षण येताच काही माणसांना अस्वस्थता येते. मग ते ध्यानीममी नसलेले पंचवीस वर्षांपूर्वीचे विषय उकरुन काढतील, जुने अपमान उपसून काढतील, काहीतरी कडवट शब्दांची नांगी मारतील... आणि छान सरळ संबंधांचा गुंता करतील. असा गुंता झाला की यांचे ८-१० दिवस मोठे मजेत जातात, मजेत याचा अर्थ त्या तडफडीचा, भांडणाचाही ही मंडळी एक हलक्या दर्जाचा आनंद घेतात.