माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:
लडाखला जाण्यासाठी जितका वेळ लागला तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्तवेळ हा 'लडाखचा सफ़रनामा' लिहायला लागतोय. काही-ना-काही बारीक-सरिक छोटी-मोठी अडचण येते आहे आणि वेळ जातोय. लिखाणाला वेळ देता येत नाही आहे. असो पण मी लिहित नसलो तरी मागे म्हटल्याप्रमाणे आता आमच्या लडाख मोहिमेमधले एक-एक भिडू त्यांच्या मनातले विचार लिहू लागलेत. अमृता पाठोपाठ आता 'मनाली'ने तिच्या मनातले 'लडाखचे भावविश्व' शब्दबद्ध करून पाठवले आहे. माझ्या हातून सुटलेल्या काही गोष्टी तिने इकडे नेमक्या टिपल्या आहेत.