जे झाले ते चांगलेच झाले. आता तरी लोक महाराष्ट्रात मराठी बोलायला लागतील. (किमान हिणवणार नाही )
या प्रकारानंतर वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांनी जे चित्र उभे केले त्यातून उभे राहिलेले काही प्रश्न.
१. अबूला हिंदी वाचता येते (हे गृहीत धरलंय ) तर मराठीतून शपथ घ्यायला काय हरकत होती ? मराठीची लिपी तिच जी हिंदीची. मग त्याने हा अट्टहास का करावा ?
२. मनसेच्या आमदारांनी जर अबूला मारले तर त्यांच्यावर कारवाई, आणि अबूवर का नाही ? अगदी विधानसभेत आणि बाहेरही मग्रुरी दाखवूनसुद्धा ? आणि चप्पलही !
३. असा काही प्रकार (किमान धक्का-बुक्की) होईल या दृष्टीने सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख का ठेवली नाही ?
४. मनसे आमदारांनी इतर २ (३? ) अमराठी भाषेतून शपथ घेणाऱ्यांना विरोध का केला नाही ?
५. मुळात अध्यक्षांनी परवानगी नाकारली असती तर अबूला हिंदीत शपथ घेता आली नसती. (असं पूर्वी कर्नाटक अन तमिळनाडूमध्ये घडल्याचे वाचले. चूभूद्याघ्या).
६. या दरम्यान राम कदम यांची मुले (व इतरांचीही) इंग्रजी माध्यमात शिकत आहेत, म्हणून त्यांचे मराठीप्रेम बेगडी आहे का ?
७. सपाच्या कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड का करावी ? मनसैनिकांनी केली असल्यास मला कल्पना नाही. चूभूद्याघ्या.
८. प्रत्येकवेळी वाहिन्या "मनसे" विरुद्ध पवित्रा का घेतात ? त्यांचच चुकत आणि दुसरा बरोबर, असं कसं ? त्यांचे मालक अमराठी / मनसेविरोधी आहेत म्हणून तर नाही ? का मुंबई तोडायची आहे म्हणून
९. हे सगळं "फिक्स" होतं असं बाळासाहेब म्हणाले, त्यात किती तथ्य आहे ? का शिवसेनेचा वाघ आता म्हातारा झाला म्हणायचं ?
१०. सरकार ऐकतच नसेल तर आमदारांनी काय करावे ? (उदा. मनसे आमदाराची खोली दुसऱ्या आमदाराने पळवली, त्यावर लगेच कारवाई का नाही झाली ? )
११. हिंदीला सारखं सारखं राष्ट्रभाषा का म्हणतात? खरंच ती राष्ट्रभाषा आहे का??
हे निखिल वागळेंनाही सांगावं लागेल वाटते. त्यांना ऑफिशिअल लँग्वेज ही नॅशनल लँग्वेज वाटते. . असो त्यांच इंग्रजी कच्चं आहेच.
या निमित्त्याने हिंदी राष्ट्रभाषा नाही हे पुन्हा एकदा कळेल, पण ते हिंदीवाल्यांनाही कळायला हवं.