बिस्कीटवालीचा पास संपला वा घरीं राहिला हें तिला ठाऊक होतें असणार. तिकीट खिडकी खूप दूर असली तर पास काढायला वेळ नसतो. मग कांहीं प्रवासी - मीं सुद्धां कधीं कधीं - गाडी चुकूं नये म्हणून तसेच तिकिटाशिवाय जातात. नाहींतर पुढच्या गर्दीच्या गाडीतून जावें लागतें. कांहीं तिकीटबाबू रोजचे प्रवासी ओळखतात व ठराविक लोकांनाच विचारतात. मी असा न विचारल्यामुळें दोन वेळां बालंबाल बचावलों आहे. दोनतीनवेळां पकडला पण गेलों आहे आणि दंडही भरला आहे. तिकीटबाबूंना पण ठराविक रक्कम पुरी करायची असते. त्यामुळें ते असा खळखळ न करतां दंड देणारांवर खूष असतात. वयस्क लोक बहुतेक लबाड असतात व फार वाद घालतात. अर्थातच मीं त्याला अपवाद.

लेख वाचून आठवणी ताज्या झाल्या. नेहमींप्रमाणें मस्त.

सुधीर कांदळकर.