विधानसभेत जे काही झालं ते फार उत्तम झालं. अबूआझमी नाहीतरी खोडसाळच आहे. छटपूजेत लाठ्या वाटायची भाषा वापरून त्यानेच हे ओढवून घेतलं आहे. हिंदी ही जर राष्ट्रभाषा आहे तर ती देशातल्या प्रत्येक प्रांतात बोलली जायला हवी. मग दक्षिण भारतात ती का वापरली जात नाही? दक्षिण भारत हा देशाचा भाग नाही का? तिथे मराठी आमदाराला कन्नडमध्ये शपथ घेतली नाही म्हणून सभागृहाबाहेर काढलं गेलं. मग महाराष्ट्रात मराठीत शपथ का नाही? आपण सर्व मराठी माणसांनी मनसेच्या मागे उभं रहायलाच हवं.