अबू आझमींना का ठोकले याचे कारण माहीत नसल्याबद्दल वाईट वाटले. अबूंना बडवण्याचे कारण त्यांनी शपथ हिंदीत घेतली हे मुळीच नाही, हे सामान्य बुद्धिमत्ता असलेल्यालाही समजावे. अनेकांनी शपथ हिंदीत घेतली.  काही जणांनी संस्कृतमध्ये घेतली. कुणी तमिळमध्ये घेतली असती तरी त्याला मनसेने विरोध केला नसता. हिंदीत शपथ घेतल्यामुळे (राष्ट्रभाषा नसलेल्या) हिंदीचा अपमान झाला नाही तर, मराठीचा अपमान झाला हे ज्यांना उमजले नाही त्यांची कींव करायला हवी. 

अबू आझमीनी 'मी मराठीला मानत नाही, मी हिंदीतच शपथ घेणार, कोण मला काय करते आहे, ते मी बघून घेईन' असे आव्हान दिले होते.  त्यांना हिंदीबद्दल प्रेम नव्हते दाखवायचे, तर मराठीचा द्वेष आहे हे दाखवायचे होते. अशा परिस्थितीत मनसेच्या (अजून शपथ न घेतलेल्या) भावी आमदारांनी त्यांना थोबाडीत मारून योग्य धडा शिकवला.  या घटनेनंतर मनसेची लोकप्रियता अधिकच वाढली हे दूरदर्शन वाहिन्या आणि वर्तमानपत्रांतील मतप्रदर्शनांवरून कळून येते. शिवसेनेबद्दल मात्र वाईट वाटते.  त्यांनी मनसेच्या निवडून आलेल्या उमेदवारांबद्दल निलंबनाच्या ठरावाला पाठिंबा द्यायला नको होता.  आता मराठी लोकांच्या मनांतून तो पक्ष आणखीनच खाली उतरणार.  काळाची पावले ज्यांना ओळखता आली नाहीत त्यांचे दुर्दैव.

(संपादित : प्रशासक)