१. वेगळा महाराष्ट्र ?
महाराष्ट्रात राज्याकारभाराची भाषा ही मराठी असली पाहीजे, आहे आणि म्हणून राज्यकर्त्यानी सुद्धा मराठीतूनच शपथ घ्यावी हेच योग्य होय. हाच आग्रह मनसे ने धरला. त्याबद्दल राज ठकरेनी सर्वाना एक पत्रही लिहीले होते आणि त्यामध्ये विनंती केली होती की मराठी मध्ये शपथ घ्या. परंतु काही नतद्रष्टांना मराठी बद्दलचा द्वेश दाखवायचा होता म्हणून त्यानी या विनंतीचा अवमान केला. आणि परिणाम भोगले. काही मराठी लोकही असे आहेत की ज्यांची अस्मिताच मेली आहे... त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार.
मराठीचा आग्रह धरणे यात चूक ती कसली? आणि मराठीचा आग्रह धरणे म्हणजे 'वेगळा महाराष्ट्र' मागणे हा 'जावई शोध' कसा काय लागला?
मनसे किंवा कोणाही महाराष्ट्रीय माणसाने वेगळा महाराष्ट्र मागितला नाही.
२. मनसे, शि. से वगैरे लोकांनी कधीही आयुष्यात अ-मराठी माणसांची काहीच मदत घेतली नाही का?
मदतीचा आणि भाषेचा काय संबंध? आणि मराठी माणसाने कधी कोणा अमराठी माणसांची मदत केली नाही असे आहे का?
३. स्वतःच्या पक्षातील मराठी न बोलू शकणाऱ्या परंतु मते मिळवायला प्रभावकारक ठरणाऱ्या नेत्याला ते हाकलून देतात काय?
याची गरज काय? जर पक्षाच्या विचाराशी तो कर्यकर्ता सहमत असेल तर तो थांबेल पक्षात.. नाहीतर जाईल आपल्य वाटेने.
४. त्यांना काय वाटते की मारामाऱ्या फक्त त्यांनाच करता येतात?
असे तर मनसे किंवा शिवसेना दोघेही म्हणत नाहीत. आणि काँग्रेस किंवा इतर पक्ष काय धुतले तांदळा सरखे नाहीत असे आपण स्वतःच लिहीले आहे.
५. भारताची सीमारेषा एकदा ठरल्यानंतर या असल्या प्रादेशिक मागण्यांना मुळात कायदेशीर आधारच नाही
हम्म्म्म्म ... काश्मिर मध्ये काय होते हो? भारताचे सगळे कायदे तिकडे लागू आहेत का?
बिहारचा माणूस अगदी बिनबोभाट महाराष्ट्रात येऊन पिढ्यानपिढ्या राहिला तरी ते कायदेशीर आहे.
बिनबोभाट येवून राहतात आणि नंतर डोक्यावर बसतात, म्हणुनच तर हा सगळा अट्टाहास आहे.
भारतात हिंदी कुठेही बोलता आलेच पाहिजे.
म्हणजे नक्की कुठे? चेन्नई , कर्नाटक, हैद्राबाद ई. मध्ये फक्त सूट आहे का? तिकडे भाषिक राजकारण चालते.
आणि 'आलेच पाहीजे" हा अट्टाहास तुम्ही का धरत आहात? हिंदी सर्वानुमते राष्ट्रभाषा स्विकारली गेली नव्हती/नाही.
स्वतःच्या मनगटात दम असेल तर स्वतः धंदे उभारून व चालवून मग गुजराती, दाक्षिणात्य, उत्तर भारतीय यांना असहाय्य करून दाखवा.
धंदे उभे करणारे मराठी लोक ते करत आहेत . आपण उघड्या डोळ्यानी बघावे.
आणि मुख्य म्हणजे, बाकीच्यांना असहाय्य करण्याची महाराष्ट्राची इच्छा नाही. स्वतः समर्थ बनने हाच उद्देश आहे.
आपण उदाहरण दिलेली राज्य बहुतांशी स्वभाषेचा वापरच करत आहेत.
६. १३ सीटा आल्या याचा अर्थ वाटेल तसे वागण्याचा परवाना मिळाला काय?
आजिबात नाही. परंतु पक्षाच्या विचारांशी ठाम राहून ते त्यांनी कृतीत आणले. येवढेच.
८. मराठी, मराठी म्हणजे काय? ज्यांना मराठीचा अभिमान आहे ते जर स्वतःच ओरिसामध्ये तेथील कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना ओरिया भाषेचा अभिमान असता.
तुम्ही स्वतःच उत्तर दिलेत की...मराठीचा का येवढा अभिमान बाःअगायचा, का आग्रह धरायचा.
आम्ही कुठे म्हणतोय की उ. प्र., बिहार मध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरा.
मराठी भाषेवर संकट आहे असा एक हास्यास्पद प्रसार केला जातो.
हो खरच की. आहो मराठी काय येवढी साधीसुधी वाटली का काय?
ते जे काही संकट समजले जात आहे ते परतवणे कुणालाही शक्य नाही याचे कारण वैश्विक एकात्मता ही संकल्पना उद्योगवाढ, शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी यामार्गांनी प्राप्य झाल्यामुळे अर्थातच जगात जास्तीतजास्त बोलली जाणारी भाषा आपला प्रभाव टाकणार. हे जर मान्य केले तर ते संकट नसून तो सध्याच्या समाजातील एक प्रवाह आहे.
एकदा हात टेकले (पराभव मान्य केला) की मग लढा संपलाच की आणि परिवर्तनही. जगातील प्रत्येक प्रगत राष्ट्र हे स्वतःचीच भाषा वापरते. ऊदा. जपान, चीन, युरोप मधील छोटे छोटे देश.
उद्या जर हिंदी बोलणारे (भारतीय) यांची एकूण लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या ५०% झाली तर झकत जगात हिंदी शाळा काढाव्या लागतील.
आपणाला हिंदीबद्दल आत्मियता दिसते बहुतेक... असो.
हेच आम्ही मराठी बद्दल म्हणू की. आमची तीच इच्छा आहे.
जे असा प्रसार करतात त्यांची अपत्ये कोणत्या माध्यमात शिकतात
हम्म्म बरोबर. पण अपत्ये अमराठी माध्यमातून शिकली म्हणजे त्यांना मराठीचा अभिमान नाही हे कसे सिद्ध होते?
दुर्देवाने भारतात उच्चशिक्षण ईतर भाषेत दिले जाते. जर ते मराठीत दिले असते तर तेच शिकलो असतो की...
(आम्हाला मुंबईत भाजी हिंदीत घ्यावी लागते अन रिक्षावाल्याला हिंदीत सांगावे लागते )
हो ना... अगदी साध्या साध्या गोष्टी सुद्धा आपण मराठीचा आग्रह धरू शकत नसू तेही या महाराष्ट्रात ज्याची मात्रूभाषा मराठी आहे, तर मग काय अर्थ राहीला?
'जिथे अजिबात मराठी चालत नाही अशा प्रदेशात तीन दिवस ठेवले तर ते अन्नपाणी परकीय भाषेत मागावे लागते म्हणून तहानलेले व भुकेले राहतील काय'?
याचे उत्तर वर दिलेच आहे. मराठीचा आग्रह महाराष्ट्रातच करत आहे, बाहेर नाही.
साधे सोप्पे आहे, "घर आपले आहे, आणि दारावर पाटी दुसर्याच्या नावाची" असे चालेल का? आपल्याच नावाची हवी ना?
तसेच महाराष्ट्र आपला आहे, मग महाराष्ट्राचीच भाषा हवी ना?
बघा विचार करून.
सचिन