पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
येणारा आत्ताचा क्षण हा आपला असतो, उद्याचा तर जाऊ दे पुढचा क्षणही आपला असेल की नाही, ते आपल्याला सांगता येत नाही. आपले मानवी जीवन हे असेच क्षणभंगूर आहे. मात्र पुढचा किंवा उद्याचा क्षण कसा असेल, त्याची काळजी करत बसण्यापेक्षा हातात असलेला प्रत्येक क्षण सार्थकी कसा लागेल, त्या क्षणी आपल्याला आणि दुसऱयानाही आपल्याला फक्त आनंद आणि आनंदच कसा देता येईल, याचा विचार केला तर हे जीवन सुंदर आहे, असे आपल्या लक्षात येईल.