इथे
इंग्रजी माध्यमात आपली मुले का पाठवतात ?
कारण मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळा उपलब्ध नाहीत म्हणून. कारण ? सरकारचं चुकीचं धोरण. त्याला मनसे वाले काय करणार होते? आणि तुम्ही-आम्ही तरी काय केलं? जे काही करायचं आहे ते आता करतीलच. त्याबद्दल मी पुर्वीच त्यांना लिहिलय.
जिथे चांगल्या मराठी शाळा उपलब्ध आहेत, तिथे अजूनही प्रवेशासाठी रांग लागते. उदा. पुण्यातील नूतन मराठी विद्यालय, आणि पार्ल्यातील.... (चूभूद्याघ्या).
टाईम्सची मुलाखत.
माझ्या माहितीनुसार ती मुलाखत मराठीत दिली होती. या व्यतिरिक्त (इतरांनी) हिंदीत दिलेल्या मुलाखतीला माझा विरोध आहे आणि तो मी मनसेला कळवला आहे. तुम्हीही कळवू शकता. महाराष्ट्रात असतांना मराठीतच बोलले पाहिजे, मग ती वाहीनी कोणतीही असो. इथे बघा
इतर भाषिक आपल्या राज्यात येऊन सहजी आपली भाषा बोलायला लागतात, निदान जुजबी तरी!
मला काही गुजराथी सोडले तर कुणीच दिसला नाही, किंबहुना मराठी नाही बोलली तरी चालते असच त्याच मत असते.
आम्हाला मुंबईत भाजी हिंदीत घ्यावी लागते अन रिक्षावाल्याला हिंदीत सांगावे लागते
हा दोष कोणाचा ? आपणच "वांगा कैसा दिया" विचारणार असू तर तो भैय्या कशाला "मराठी" शिकण्याचे कष्ट घेईल?
ही असली संकटे (आम्हाला मुंबईत भाजी हिंदीत घ्यावी लागते अन रिक्षावाल्याला हिंदीत सांगावे लागते ) समाजासमोर आणणारे अन त्याचा मतांसाठी व स्वस्त प्रसिद्धीसाठी वापर करणारे यांना 'जिथे अजिबात मराठी चालत नाही अशा प्रदेशात तीन दिवस ठेवले तर ते अन्नपाणी परकीय भाषेत मागावे लागते म्हणून तहानलेले व भुकेले राहतील काय'?
हे संकट मनसे वा सेनेने आणले नाही तर मराठी माणसानेच (त्याच्या सहिष्णुतेने/ बोटचेपेपणामुळे) आणले आहे. मी मराठी बोलतो तर रिक्षावाले आणि भाजीवालेच नव्हे तर व्यापारीसुद्धा "तुटकफुटक" का होईना मराठी बोलतात. कारण त्यांना व्यापार करायचा आहे.
'जिथे अजिबात मराठी चालत नाही अशा प्रदेशात तीन दिवस ठेवले तर ते अन्नपाणी परकीय भाषेत मागावे लागते म्हणून तहानलेले व भुकेले राहतील काय'?
याचं उत्तर बरेचदा दिल्या गेलंय. जिथे जाल तिथली भाषा, संस्कृती शिका आणि आचरणात आणा, हे स्वतः राज ठाकरे म्हणतात. मग हा प्रश्नच येत नाही.
बाकी प्रश्नांची उत्तरे सचिननी दिली आहेच.
"महाराष्ट्रात राहू इच्छिणाऱ्या सर्व लोकांनी आपले व्यवहार मराठीत करावे, आणि मराठी लोकांनी इतर ठिकाणी गेल्यावर तिथली भाषा व संस्कृती जपावी " हेच मनसेचे (आणि माझेही) म्हणणे आहे. उगाच इथे राहून दुसरी भाषा बोलावी म्हणून जबरदस्ती मुळीच करू नये, आणि असं करणारा सांगून, समजावून ऐकत नसेल (अबूसारखा) तर त्याला कळेल अशीच भाषा वापरली पाहिजे. उदा. झोडणे.
ता.क. :- गेल्या १५ वर्षात अहिंसक मार्गाने झालेल्या आंदोलनापैकी किती आंदोलनकर्त्यांना न्याय मिळाला, आणि त्यासाठी त्यांना किती वेळ, कष्ट पडले ? मग तोंडात वाजवून न्याय मिळत असेल तर लोक तोच मार्ग वापरणार नाही का ?