'प्रतिक्रियात्मक मराठीपणा'
मागच्या ६० वर्षात बाकीच्यानी जी येवढी घाण करून ठेवली आहे ती निस्तरणे हे काय एक दिवसाचे काम वाटते का आपणाला?
राहीला प्रश्न शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? तर याला बिचारे पालक काय करणार. जर आपल्या इथे सरकारच मराठी शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार नसेल तर काय उपयोग.
जिथे चांगल्या मराठी शाळा आहेत तिथे आजही पालक रांगा लावून प्रवेश घेत आहेत आपल्या मुलांसाठी.
असो...
कसं आहे बघा, सुरुवात ही एका छोट्या पावलाने होते... मग त्याची पाऊलवाट... आणि नंतर तिचाच होतो ... राजमार्ग!
तेव्हा, आता ही सुरूवात झाली आहे. हळू हळू होईल की सगळं नीट.
काही लोकं किमान 'प्रतिक्रियात्मक मराठीपणा' तरी अवलंबत आहेत ... हे ही नसे थोडके!!!
बाकीचे तर तेही करू धजत नाहीत!!!
मनसे काय करते आहे?
दुवा क्र. १ : इथे बघा. राज ठाकरेंनी सर्व शाळांना एक पत्र लिहीले आहे, मराठी भाषा विषयाबद्दल. तेव्हा मनसे चे एकूण प्रयत्न सुरू आहेतच.
सचिन