मराठी माध्यमाच्या शाळा का नकोशा होतात ? -

असहमत ! - कारण माझ्या मते ईंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाउन काहीही चुक करत नाहि. ! जे ग्लोबलाईझेशन आहे ते अंगिकारले पाहिजेच... कारण, आज जर तुम्हाला जगावर राज्य करायचे असेल तर जागतिक भाषा शिकणे आवश्यकच आहे... पण, ह्याचा अर्थ मराठी सोडून हे सगळं करा असा होत नाहि... ! एनेक भाषा येणे कधीही चांगले, परंतु त्यामध्ये अभिमान मात्र मराठीचा हवा, आणि त्यातही मराठीसाठी काहितरी तळमळ, रोजच्या बोलण्यात प्राधान्य असे करता येतेच कि... !

मराठी शाळा नकोशा नाहीत.. तर मराठी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा अजुनही तेवढा सुधारित नाही, किंबहुना आता होत आहे... बहुतांश मराठी शाळा बदलत आहेत... झालचं तर ईग्रजी माध्यमाप्रमाणेच सर्व सोयीसुविधा आणि स्पर्धेच्या युगात उतरण्यासाठी विद्यार्थांन्ना सज्ज करत आहेत, परंतु महत्त्वाची बाब ही आहे कि "मराठी" आणि "अनुदान" यांची सांगड बसत नाही...

पैसा आला तर सुधारणा... आणि सुधारणा असेल तरच पैसा... !  हे दुष्टचक्र थांबत नाहिये... आपण स्वतः ईग्रजी शाळेत शिकूनही मराठी संगोपणारे,जोपासणारे अन वाढवणारे बरेच लोक आहेत... 

पाणी एकच.. ते विषात घातले तर मारक, मिरचीत घातले तर तिखट आणि गुळात घातले तर गोड होते... ! आपण ठरवायचे की विष होऊन स्वकियांचा जीव घ्यायचा का गुळ होऊन त्यांचे तोंड गोड करायचे...