* जगात इंग्रजी चालते- मान्य (खरतर थोडेसेच मान्य, इंग्रजांचे राज्य नसलेले देश इंग्रजी पासून बरेच लांब आहे अजून).
* जगातिल स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी शिकणे आवश्यक- थोडेसे मान्य, जगातील नव्हे तर भारतातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इंग्रजी सध्या तरी आवश्यक.
* इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी शाळेत जाणे आवश्यक- एकदमच अमान्य. इंग्रजी शिकणे (अगदी ठेम्स नदीच्या काठचेही) आणि इंग्रजीत शिकणे यात पुष्कळ फरक आहे. इंग्रजीतून शिकण्यामुळे आपण नक्कीच भाषेचे नुकसान करतो आहोत. आपल्या पुढची किंवा त्यापुढची पीढी मराठी राहीलेली नसेल. ती धड इंग्रजीतरी होईल का ते माहीती नाही.
मराठीच्या नावाने सध्या बोंबाबोंब करणारे आपापल्या मुलांना जर इंग्रजी शाळेत घालणार असतील, तर त्यांचे ते मराठी प्रेम खरोखरच बेगडी आहे असे म्हणावे लागते. मराठी शाळांची अवस्था फार चांगली नाही हे खरे आहे (१. सुशिक्षित/उच्चशिक्षित वर्ग हळू हळू शाळांपासून दूर स्कूल्स कडे गेला, दर्जा घसरण्या पूर्वीच २. शाळांवरील सरकारचे नियंत्रण) पण या मुखंडांनी शाळेला पत्र पाठवण्यापलिकडे त्यासाठी काय प्रयत्न केले आहेत? कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करणर्यांना दर्जेदार मराठी (खाजगी) शाळा सुरू करून नवीन परंपरा निर्माण करता येणार नाही काय? महाराष्ट्रातील अमराठी बांधवांपेक्षा मराठी राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी आणि अर्थातच मराठीजनांनी मराठीचे आणि मराठी माणसांचे अधिक नुकसान केलेले आहे.
अजून थोडी वर्ष थांबा आत्ताच्या या नेत्यांची पुढील पीढी मराठी माणसांच्या पुढील पीढी साठी इंग्रजीतून संघर्ष करेल. अबू आजमीची पुढील पीढी हिंदीतुन शपथ घेईल, आणि हे त्यांच्या हेड वर शूज मारतील.