अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
गंगा नदीला भारतीय संस्कृतीमधे अनन्यसाधारण महत्व आहे. गंगाजल हे अतिशय पवित्र मानले जाते. माणसाच्या अखेरच्या क्षणी, त्याच्या मुखामधे गंगाजलाचे थेंब टाकण्याची प्रथा आहे. गंगेमधे स्नान करण्याने माणसाची सर्व पापे धुवून निघतात असे म्हणतात. उत्तर भारतातील लोक तर गंगेला, गंगामैय्या म्हणजे आईच मानतात. कदाचित युगानुयुगे सर्वांची पापे धूत असताना, गंगामैय्याने बहुदा ती स्वत:कडेच ठेवली असावीत. आता मात्र तिला या पापांचा भार असह्य झालेला दिसतो आहे कारण गंगा नदीचे अस्तित्व राहणार आहे की नाही याचाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
वाराणसी शहरात, ...
पुढे वाचा. : जय गंगे भागिरथी !