माझ्या वडिलांनी सांगितलेली माझ्या आजोबांची (आईच्या वडिलांची) एक आठवण.
सुमारे ४६ / ४७ साली आजोबा आमच्या घरी पुण्याला आले असताना वडील त्यांना शनीच्या पारावर घेऊन गेले. (तेव्हा शनीच्या पारावर बसण्यासारखी परिस्थिती असावी! ) तेव्हा आजूबाजूची ती 'गर्दी' पाहून आजोबा वडिलांना म्हणाले, "अरे बापरे! काय हो तुमच्या पुण्याला ही गर्दी! जातात कुठे इतकी सगळी माणसे रोज?"
सध्याचा बाजीराव रस्ता तेव्हाच्या बाजीराव रस्त्याच्या सुमारे दोन-सव्वादोनपटतरी रुंद असावा. शनीच्या पाराजवळ सध्या होणाऱ्या गर्दीशी ह्या अनुभवाची तुलना करून पाहता येण्याजोगी आहे असे वाटते.