हा अतिशय गंभीर विषय आहे. मी सुद्धा सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंट ची सभासद आहे. पण नुसती सदस्यच! बाकी काही नाही केले.
मला खरे तर रस्ते लवकरात लवकर दुरुस्त आणि पूर्ण कसे होतील हाच मुद्दा महत्त्वाचा वाटतो. बेधुंद वाहन चालकांमध्ये बहुतांश तरुण हे परराज्यांतील असतात... तो एक निराळाच वादाचा मुद्दा आहे. हा जागर त्यांच्या पर्यंत किती पोहोचतो कोण जाणे!
पण पी एम टी, पौड रस्त्या वरून सुटणारी नीता व्होल्व्हो ची प्रचंड धुडं, सुसाट टू व्हिलर्स, खणलेले अरुंद रस्ते यातून जीव मुठीत धरून जाणारे नागरीक.. अथर्व साठे सारखी पुनरावृत्ती होऊ नये अशी भीती मनात सतत भरून राहते.