आपण स्वतः इंग्रजी शाळेत शिकूनही मराठी संगोपणारे, जोपासणारे अन वाढवणारे बरेच लोक आहेत...  

पण किती ? माझ्या माहितीप्रमाणे आणि मला आलेल्या अनुभवातून इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना मराठी धड वाचता येत नाही, मग लिहिण्याचे तर सोडाच. मी शिकवणी घ्यायला जायचो तेव्हा पुण्यातील मराठी कुटुंबातील मुलांची गणित, विज्ञान आणि मराठी अशी शिकवणी घेत होतो.  

कोट्यावधी रुपयांचे व्यवहार करणाऱ्यांना दर्जेदार मराठी (खाजगी) शाळा सुरू करून नवीन परंपरा निर्माण करता येणार नाही काय?

आणि जर हेही जमत नसेल तर किमान मराठी शाळांमध्ये इतर विषयांसोबतच दर्जेदार इंग्रजी शिकवावं (किंवा तशी व्यवस्था करावी). जेणेकरून अधिकाधिक लोक मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवतील. जे यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातल्या उत्तर वाढोणा या छोट्याश्या गावात शक्य होतं,(५-७ चे विद्यार्थी इंग्रजी बोलतात) तर इतर शहरांच्या ठिकाणी का शक्य नाही ? त्या शाळांतील शिक्षकांचा आणि शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून मनसेच्या लोकांनी पुढाकार का घेऊ नये ?

काल राज ठाकरेंनी म्हटल्याप्रमाणे, "फोटोसाठी आंदोलन" न करता खरच काम का करू नये ?

महाराष्ट्रातील अमराठी बांधवांपेक्षा मराठी राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी आणि अर्थातच मराठीजनांनी मराठीचे आणि मराठी माणसांचे अधिक नुकसान केलेले आहे.

१००% सहमत. यावर्षीच १००० हून अधिक इंग्रजी शाळांना मान्यता दिली आहे. यावरून सरकारला (विशेषतः काँग्रेसला) मराठीला नाहीसं करायचं आहे हेच दिसतंय. मराठी लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता स्वतःच्या मराठी माध्यमाच्या पण इंग्रजी शाळांपेक्षाही उत्तम सर्व विषयांचे आणि विशेषतः इंग्रजी (LSRW श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन) शिकवावं, जेणेकरून इंग्रजी शाळांचं भूत कमी होईल.

अवांतर :- आर आर पाटील यांची मुलं तासगावलाच शिकतात असे ऐकले आहे. ती मराठी शाळा असावी असे वाटते, त्यांचे अभिनंदन.  

(संपादित : प्रशासक)