बेधुंद वाहन चालकांमध्ये बहुतांश तरुण हे परराज्यांतील असतात...
गेली पंधरा वर्षं मी रोज भर रहदारीमध्ये किमान सहा किलोमीटर सायकल चालवत जातो. माझ्या निरीक्षणानुसार पुणेकर अत्यंत बेशिस्त पद्धतीनं आणि बेपर्वाईनं वाहनं चालवतात. चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक करणं; सिग्नल तोडणं; सिग्नल असो नसो, डावीकडे वळणं, मर्जीनुसार लेन बदलणं; अशा सर्व गोष्टी आपला जन्मसिद्ध हक्क मानणं, आणि कोणी हरकत व्यक्त केल्यास (अगदी पोलिसासकट कोणीही) त्याच्याशी अद्वातद्वा बोलणं, वाद घालणं हे सर्व करणारे पुणेकरच आहेत. आता आर्थिक परिस्थिती बदलल्यानंतर अनेक पुणेकरांना चार चाकी गाड्या परवडतात, पण त्यादेखील सायकलसारख्याच चालवण्यात धन्यता मानणारे अनेक पुणेकर मला दररोज दिसतात. त्यात आता मोबाईल आल्यानं आणखी जीवघेणी भर यात पडली आहे. वाहन चालवताना आलेला फोन घेणारे आणि त्यामुळे वेडीवाकडी गाडी चालवत स्वतःबरोबर इतरांचा जीवही धोक्यात घालणारे किमान वीस जण मला रोज दिसतात. त्यातले बहुतेक मराठीतूनच बोलताना मला ऐकू येतात. त्यामुळे रस्त्यावरची दहशतच म्हणायची तर स्थानिकांचीच जास्त आहे, असं माझं निरीक्षण आहे.
(मी स्थानिकच आहे. गोत्र: शनिवार पेठी)