नेमेची येतो पावसाळा, मग खड्डे होतात. ट्रॅफिक प्रॉब्लेम होतात. लोक चर्चा करतात. म्धे मध्ये फार झाले तर कसली तरी चळवळ अभियान होते. पुढे त्याचे काय होत कळत नाही. (बहुद नेतृत्व विकसित झाले की प्रायॉरिटी बदलत असाव्यात. )
मागेही एक्स्प्रेस फोरम नावाचा काहीतरी प्रकार होता. (एक्स्प्रेस नुकता पुण्यात विकायला लागले होते! ) त्यात असेच पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न घेतला होता. (मी एका मीटींगला गेलो होतो त्यत स्वतः एच के फिरोदिया स्वतःचा वेळ देऊन चेंबर ऑफ कॉम्मर्स मध्ये आले होते आणि पूर्ण वेळ चर्चेत भाग घेत होते) पुढे काय झाले काय माहीत?
टिळकरोडवर राहणार्या एका गृहस्थांच्या मुलीचा मृत्यू बेकायदेशीर रीत्या टिळकरोडवरून जाणाऱ्या ट्रकमुळे झाला. त्यांनीही असेच काहीतरी सुरू केले होते. त्यांचा अनुभव काय आहे कुणाला माहीत?