अब्द येथे हे वाचायला मिळाले:
आता तसं भाऊ पाध्ये वारले ते कधीतरी १९९६च्या जानेवारीमध्ये. नक्की कसे गेले माहीत नाही, पण सत्तरच्या आसपास वय झालंच होतं आणि ८९ साली अर्धांगवायू झाल्यामुळे अपंगत्व आलं होतं. म्हणजे मुद्दामहून त्यांना कोणी मारलेलं नाही. पण मुद्दा आहे तो, वारल्यानंतर ते मराठी लोकांच्या मेंदूतून एवढे लवकर मेले कसे काय?