लेख फार आवडला. खरोखरच संप्रदायांच्या भिंती आपण मजबूत केल्या आहेत. प्रत्येक जण शेवटी ते एकच सत्य शोधीत आहे, केवळ मार्ग भिन्न आहेत. हे जर लक्षात ठेवले, तर 'आमचाच मार्ग बरोबर' ही भावना जाईल व 'प्रवृत्ती-निवृत्ती', वारकरी-धारकरी' इ. इ. वाद थांबतील!
गीता हा केवळ तात्त्विक विचार सांगणारा ग्रंथ नसून जीवनग्रंथ आहे हे ही खरेच! 'संसारसागरातील गीतादीपस्तंभ' नावाचा श्रीकृपा प्रकाशन प्रकाशित एक ग्रंथ पाहिला. त्यात श्लोकांचा सरळ अर्थ व थोडे विवेचन आहे. त्या तत्त्वज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात साधकाला उपयोग कसा करून घेता येतो या भूमिकेतून हे विवेचन केलेले आहे.
गीतामहाग्रंथाचा खरोखर जसा अर्जुनाला उपयोग झाला, तसाच आपल्यामधील अर्जुनालाही व्हावा!