म्हणून दोन ग्रंथांचा उल्लेख नेहमी केला जातो. एक म्हणजे श्रीमद् भगवद्गीता, जी 'जगावे कसे' हे शिकवते तर दुसरा महाग्रंथ आहे, श्रीमद् भागवत, जो 'मरावे कसे' याची शिकवण देतो. या दोनही ग्रंथांचे श्रद्धापूर्वक परिशीलन जीवन यशस्वी करण्यासाठी साहाय्यभूत होणारे आहे. या दोन ग्रंथाद्वारे दिलेल्या शिकवणूकीबद्दल प्रत्येक मानव महर्षी व्यासांचा ऋणी आहे. हे ऋण फेडावयाचे तर महर्षींच्या शिकवणूकीचा, निदान जमेल तेव्हढा, अंगिकार करावयास हवा.
नवविधाभक्तीत वाचन हीही एक भक्ती आहेच. आपल्या लिखाणाबद्दल धन्यवाद.