श आणि ष मध्ये फरक तर आहेच. हिंदीमध्ये शीर्ष, शेष हे शब्द बरेच वापरले जातात. (मराठीपेक्षा अधिक प्रमाणात.)मराठीमधल्या तत्सम शब्दांमधे दुः आणि निः ने सुरू होणारे शब्द पुष्कळ आहेत. या दोन्हींपुढे जर कठोर व्यंजन आले तर त्यातल्या विसर्गाचा ष होतो. (च आणि त वर्ग व्यंजने अपवाद. ) मृदू व्यंजन अथवा अनुनासिक आल्यास र होतो. उदा. दुष्कर,दुष्प्राप्य,निष्क्रिय,निष्पन्न,निष्फल,वगैरे.  दु:ख,नि:पात,अश्या काही शब्दांमध्ये विसर्ग तसाच राहतो.

विसर्गापुढे च किंवा त वर्गातील कठोर व्यंजने आल्यास विसर्गाचा अनुक्रमे श आणि स होतो. उदां. निश्चल, दुश्चित्त इ.   मृदू व्यंजनाआधीच्या विसर्गाचा मात्र सर्वत्र र होतो. उद.दुर्गती,निर्गमन,दुर्जन,निर्जन,दुर्दम्य,निर्धार,दुर्धर,इ.

असो. थोडे विषयांतर झाले आहे खरे. वाचक माफ करतील अशी आशा आहे.