१. "इंग्रजी भाषेमुळे समानता येईल" असे आपण म्हणता त्यावेळी "इंग्रजी भाषा बोलता येणाऱ्या लोकांमध्ये समानता येईल" असे आपले म्हणणे असावे. कारण इंग्रजी बोलता येणारे अल्पसंख्य आणि न बोलता येणारे बहुसंख्य यांत समानता येणार नाही.
२. शुद्ध आणि प्रमाणित भाषेऐवजी अशुद्ध बोलणाऱ्याची जात समजते असे आपण म्हणता ते बरोबर नाही. भाषेवरून मनुष्य कुठल्या भागातला आहे ते समजते. ज्याला आपण शुद्ध आणि प्रमाण मराठी समजतो त्याला जवळ जाणारी भाषा कोकणातले सर्व जातीजमातीचे लोक बोलताना दिसतात तर देशावरचे अगदी ब्राह्मणसुद्धा जी भाषा बोलतात ती शुद्ध आणि प्रमाणित आहे असे म्हणता येईल याची खात्री नाही. म्हणूनच विदर्भ - मराठवाडा- पश्चिम महाराष्ट्रातले लोक "पुण्याची शुद्ध भाषा आम्ही का प्रमाण मानावी? " असा प्रश्न विचारतात.
३. इंग्रजी शिकलेल्यांमध्ये एक फरक दिसतो. मराठी मनुष्य इंग्रजी लिहिताना व्याकरणशुद्ध लिहितो पण बोलताना चूक होईल या भीतीने अडखळत बोलतो. तर दक्षिणी मनुष्य चुकांचा विचार न करता धडकून बोलतो. अर्थातच फाडफाड बोलणारे लोक अडखळत बोलणाऱ्याला कमी लेखणारच.
४. सर्वात मजेची गोष्ट सांगतो. मी नोकरीला असताना माझा असिस्टंट गोव्याचा ख्रिश्चन होता. तो फाडफाड इंग्रजी बोलायचा तर माझी ततपप व्हायची. एक दिवस तो माझ्याकडे कोरा कागद घेऊन आला "गोरे मुझे लीव्ह ऍप्लिकेशन लिख के देना? " मी आश्चर्याने आ वासला. "काय तुला चार ओळींचा रजेचा अर्ज लिहिता येत नाही? इतके फाडफाड इंग्रजी बोलतोस कसे? " तो म्हणाला "इंग्रजी भाषा आम्ही घरी आईवडिलांकडून बोलायला शिकलो पण शाळेत न गेल्याने लिहिता येत नाही. " तेव्हापासून माझा "आपल्याला फाडफाड इंग्रजी बोलता येत नाही" हा न्यूनगंड गेला.
५. सर्वात महत्त्वाचे. समानता कुठल्याही कारणाने, कुठल्याही भाषेने येणार नाही. कारण आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टीचे भांडवल करून "मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे" हे दुसऱ्याला सांगणे आणि त्याला कमी लेखणे ही मानवी प्रवृत्ती आहे. त्याला काही उपाय नाही.
विनायक