महेश राव, आपण जाणताच की एक गुरू अक्षर गाळल्यावर वृत्त समान राहात नाही. त्यामुळे हे हिरण्यकेशी होणार नाही. अर्थात, या वृत्ताचे नाव छंदोरचनेत मिळावे.
मिलिंद - गजल आवडली. सगळेच शेर छान झाले आहेत. संगणक हा शेर या काळात फार चांगला. इतरत्र आधीच प्रतिसाद दिलेला असल्याने इथे राहून गेले.
मानस ६ - ते दोन शेर गंभीर आहेत हे आपले मत वाचले. शेरामधील संदेश गंभीर आहे म्हणून शेर गंभीर होऊ शकत नाहीत. अभिव्यक्तीपण गंभीर / संदेशाशी जबाबदारीने मिळतीजुळती असायला हवी. आपला एक मतला आठवला . 'एक वेडी वेदनेची जात आहे, त्यात आता श्रावणाची रात आहे'! हा मतला सुरेख आहे, संदेशाशी अभिव्यक्ती, शब्दांची निवड फार छान जुळत आहे. मात्र 'चिरे लाव हे तटांसारखे , शेर बांध अन भटांसारखे' यातील संदेश गंभीर असूनही अभिव्यक्ती त्या तोडीस तोड नाही. त्यामुळे हा मतला हझलीश नाही तरी नेमका गंभीर झालेला नाही.