ज्याला आपण शुद्ध आणि प्रमाण मराठी समजतो त्याला जवळ जाणारी भाषा कोकणातले सर्व जातीजमातीचे लोक बोलताना दिसतात तर देशावरचे अगदी ब्राह्मणसुद्धा जी भाषा बोलतात ती शुद्ध आणि प्रमाणित आहे असे म्हणता येईल याची खात्री नाही.
कोकणातले सर्व जातीजमातीचे लोक बोलताना दिसतात ती शुद्ध आणि प्रमाण मराठी - हा शुद्ध गैरसमज आहे.
कोणतीही भाषा शतकानुशतके एकसारखी राहू शकत नाही, यानुसार १६ व्या अगर १७ व्या शतकातली मराठी 'प्रमाण मराठी' समजण्यात येउ शकते.
एखाद्या भाषेवर दुसर्या भाषेच्या प्रभावाने ती अशुद्ध वाटू शकते, आणि हे साहजिकच आहे. मात्र त्याच वेळी प्रत्येकाला त्याची मराठी शुद्ध आणि प्रमाण मराठीच्या जवळ जाणारी वाटत असते. आणि त्यामुळे गैरसमज होउ शकतात.
नागपुरी मराठी वर हिंदी, तर सोलापुर मध्ये स्थानिक तेलुगू लोकान्मुळे मराठी चा हेल बदलला आहे, त्याचप्रमाणे कोकणी अनुनासिक उच्चार हेदेखिल मुळात तेथिल स्थानिक मच्छीमारांच्या आगरी तसेच गोवन (कोकणी) भाषेचा प्रभावाने आहेत, त्यामुळे ती शुद्ध ठरत नाही.