सर्वच बोलीभाषा आप‌आपल्या परीने शुद्ध आहेत, परंतु त्यांतली एकच भाषा प्रमाण असू शकते ते वर येऊन गेलेच आहे. ही प्रमाणभाषा शाळेत शिकवली जाते आणि लेखनासाठी फक्त तीच योग्य असते हे ध्यानात ठेवले की गैरसमज होण्याचे कारणच उरत नाही.
प्रत्येकाची मराठी शुद्ध असली तरी प्रमाण नसणार हे चिरंतन सत्य असणार आहे.
प्रमाणभाषादेखील बदलते, पण ते बदल अत्यंत सावकाश होतात. बोलीभाषेचे तसे नाही ती दिवसागणिक, गावगन्‍ना, वयानुसार आणि जातिनिहाय बदलत असते.--अद्वैतुल्लाखान