लिहिले जाणारे प्रतिसाद मूळ विषयाला बगल देणारे आहेत.  इंग्रजीमुळे भारतात समानता येऊ शकते का, हा मूळ प्रश्न  होता. त्याचे उत्तर हो ! निदान काही प्रमाणात तरी समानता येणे संभवनीय आहे. भारतातल्या केरळ राज्याचे उदाहरण डोळ्यासमोर आणा. तिथले हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यांत केवळ भाषा समान असल्याने कमालीचे सख्य आहे. इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून शिकणाऱ्या विविध भाषक मुलांमध्ये जातिभेद नसतो. आपल्या पाल्याचे मित्र व पाल्याच्या मैत्रिणी कुठल्या जातीच्या आहेत याची पालक चौकशी करत नाहीत. (चौकशी केली तरी त्यांनी त्या जातीचे नाव ऐकलेले नसण्याची दाट शक्यता असते. ) प्रांतिक भाषेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांचे तसे नसते. ते आडनावावरून जात ओळखतात आणि मुलांवर बंधने घालतात. जातवाद पसरवण्याचे काम मुले करीत नाहेत, ती जबाबदारी पालकांनी आपल्या खांद्यावर घेतलेली असते !