दक्षिणेला अगस्ती नावाचा तारा आहे. तो त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे दक्षिणेला पाय करून झोपलेल्या माणसाचे रक्त पायाकडे  खेचतो, त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने मानसिक विकृती उत्पन्न होऊ शकतात, असे पूर्वजांचे म्हणणे आहे. अर्थात हे एका दिवसात किंवा महिन्याभरात होत नसावे. ज्याला विषाची परीक्षा घ्यायची असेल त्याने आयुष्यभर दक्षिणेकडे पाय करून झोपावे, आणि परिणामाला तयार व्हावे, आमचा अजिबात विरोध नाही.
मेल्यानंतर मृत देह दक्षिणेकडे पाय करून ठेवतात.  ज्याला जिवंतपणीच तसे झोपायचे असेल त्याला देव नाही, पण कदाचित यम मदत करेल.
दक्षिणेकडे किंवा ईशान्येकडे दरवाजा असला की तो पावसाळाभर बंद ठेवावा लागेल, याची जाणीव ठेवून तसे दरवाजे करा.
घरात उन्हाचा प्रवेश होऊन घर नैसर्गिकरीत्या जंतुविहीन करायचे नसेल तर घर उत्तर-दक्षिण दरवाज्यां-खिडक्यांचे घ्या. पूर्व आणि पश्चिमेला बिनखिडक्यांच्या भिंती असतील. विजेचे अतिरिक्त बिल आले की भरण्याची ऐपत असली की झाले.
ता. क. आपण उत्तर गोलार्धात आणि त्यातही महाराष्ट्रात राहत नसाल तर वर लिहिलेले वाचले नाहीत तरी चालेल.