अगस्ती तारा रक्त खेचतो ही पूर्वजांची कल्पना होती, कुणी पडताळणी करून बघितलेली नाही.  अगस्तीच्या गुरुत्वाकर्षणाचा जोर, जर पडतच असेल तर,  दक्षिणेकडे पाय करून झोपणाऱ्या माणसावरच पडणार. आडव्या झोपलेल्या माणसाला धक्का देता येईल पण ओढता येणार नाही. या उलट, भूकंपाचा सौम्य झटका कंपलाटेच्या मार्गाला लंबरूप झोपलेल्या माणसाला अधिक जाणवतो.
चंद्र-सूर्य-शुक्र यांचे गुरुत्वाकर्षण फक्त समुद्राच्या पाण्यावर चालते, नद्यांच्या किंवा तलावांच्या पाण्यावर का दिसत नाही? तरी असे म्हणतात की अमावास्या-पूर्णिमेला  मनोरुग्णांचा वेडेपणा बळावतो, स्त्रियांचा पाळीचा त्रास वाढतो. सूर्याच्या दक्षिणायनाच्या काळात दमा विकार बळावतो व वृद्धापकाळाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढते हा सर्वसामान्य अनुभव आहे.
जोपर्यंत या कल्पनांवर संशोधन होत नाही तोपर्यंत त्या सर्वस्वी त्याज्य समजण्याचा धोका पत्करू नये.