हे कसे म्हणाल तर काही मनोगतींनी मनोगतवर कविता फार होतात अशी ओरड केली तरी कवितांचा ओघ कमी न होता वाढतच चालला कारण ते मनोगती म्हणतात
केशवसुतांची कविता । जरी जगी पावे मान्यता । म्हणून काय इतरांनी कविता । करूच नये
 मनोगतवरच हिमेश रेशमियाविषयी बरीच उलटसुलट चर्चा व प्रतिसाद आले ते वाचून हिमेशजी म्हणण्याची शक्यता आहे
नौशाद बर्मन शं.ज. यानी । अनेक सुंदर केली गाणी । म्हणून काय हिमेश रेशमियानी । संगीत देऊच नये ॥   
सास बहू मालिका बघून कंटाळलेल्यानी ओरड केली तरी त्यांची सुटका नाही कारण
रामायण महाभारत सागरांनी । वेड लावले जना दाखवूनी । म्हणून काय एकता कपूर सारख्यानी ।मालिका काढूच नये ॥
बायकोचा स्वयंपाक चांगला झाला नाही म्हणण्याची मात्र सोय नाही कारण तिच्याकडून ज्ञानेश्वरीचा उपदेश पाळला जाऊन 
अनेक रुचकर पदार्थ ।संजीव कपूर करी खाना खजान्यात ।म्हणून काय इतरानी पाककलेत । लक्ष घालूच नये ॥
असे ती  म्हणाली तर ठीकच नाहीतर
खाण्याची हौस एवढी जर । मिळेल ते गिळायचे नसेल तर । चालू लागा जावा ढाब्यावर । थांबा मीही येते ॥
असेही उत्तर मिळण्याचीच शक्यता आहे.