तीन ढ मुलांचा चित्रपट मलाही आवडला. शिक्षणातून काय मिळवायचे हे उत्तमरित्या दाखवले आहे.
या चित्रपटातून पालक मुलांवर अमके तमके होण्याची सक्ती करतात हे वाईट हा संदेश पोचतो खरा, पण तो नक्की बरोबर की चूक हे मला ठरवता आले नाही. अपेक्षांचा अतिरेक वाईट हे मान्य. पण २५, ३० पावसाळे जास्त पाहिलेल्या पालकांच्या मताला अगदीच काडीची किंमत देऊ नये असा संदेश नको. फरहान शेवटी म्हणतो ते पटले, की तुम्हाला माझे म्हणणे पटले तरच मी रूळ बदलतो. असा संवाद आवश्यक आणि महत्त्वाचा आहे, असा संदेश जायला हवा होता असे मला वाटले.