माझी भटकंती येथे हे वाचायला मिळाले:
सध्या माझ्या बर्याच ब्लॉगर मित्रमैत्रीणींनी सहजच त्यांच्या मनातलं सांगितलं आणि ते म्हणजे आता त्यांना ब्लॉगवर नियमितपणे लिहिता येणार नाही..त्यानंतर मग जिवनिकेने अगदी योग्य शब्दात त्यांना समजावलंही आणि ती पोस्ट वाचताना मला आठवलं की ही लोकं निदान छान छान पोस्टस लिहून तरी निवृत्तीचे संकेत देतात पण मी मात्र अगदी (बहुतेक उसन्या) उत्साहाने चालु केलेल्या या भटकंती ब्लॉगचं मी काय करुन ठेवलंय?? नव्याचे नऊ पण नाही फ़क्त दोन पोस्ट्स?? छे ते काही नाही यावर्षात या ब्लॉगवरचा आळसही थोडा झटकला पाहिजे नाही का??