संजय, तुमच्या मताचा आदर आहेच. पण ह्या चित्रपटाने सगळ्यात जास्त मार खाल्ला आहे तो पटकथेतच असे मला वाटते. मूळातली उठवळ कथा अजूनच उठवळ बनवून निव्वळ पाट्या टाकलेल्या दिसतात. नेहेमीचे क्लिशे वापरून कथेला वळणे देत कुठेही  नाविन्य दाखवलेले नाही. थोडी मेहेनत घेऊन पटकथा प्रभावी करण्याचा प्रयत्न नक्कीच करता आला असता.

लग्नाच्या जेवणातला तुम्ही दिलेला प्रसंग हा विशेष दखल घेण्यासारखा तुम्हाला का वाटला ते समजले नाही. कॉलेज जीवनात असले प्रसंग सगळ्यांच्याच जीवनात घडतात ते आठवून आठवून लिहिले तर कुणीही अश्या प्रकारचे प्रसंग लिहू शकेल असे वाटते. टाईमपाससाठी ठीक आहे पण त्यात प्रभावित होण्यासारखे आणि समजण्यासाठी दोन दोनदा ऐकण्या इतके काय आहे ते समजले नाही.