या नावाचे जे शहर आहे तो एक मोठा प्रश्न आहे. याच शहरात हे असले वाद निघू शकतात. पुण्यातल्या रिक्षेवाल्यांवरून का नाही वाद निघत? कारण बहुतांशी काय जवळपास सर्वच रिक्षावाले मराठी असतात. नागपुरला हा वाद का नाही निघत? कोल्हापुर, सातारा, सांगली, लातुर, उस्मानाबाद, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, अलिबाग, चंद्रपूर हे महाराष्ट्रातील इतर काही जिल्हे आहेत. इथे असले वद झालेले का ऐकायला मिळत नाही?
मुंबईच्या महाराष्ट्रीय लोकांनी वेळीच परभाषिक आक्रमणे न थोपवल्यामुळे, मुंबई हे अखंड भारतातील एक शहर असल्यामुळे व मुंबई हे एक बंदर असल्यामुळे त्या शहराची ही अवस्था झालेली आहे.
त्या मुख्यमंत्र्यांनी आपली भाषा एकाच दिवसात बदलली हे छापून आले. त्यांना इतर शहरांबाबत अशी काही भूमिका घ्यायची कधीही वेळ येत नाही. फक्त मुंबईबाबतच या गोष्टी होतात.
वास्तविक पाहता मुंबई हा एक केंद्रशासित प्रदेश करून नागपूरला किंवा पुण्याला महाराष्ट्राची राजधानी करायला हवे. याचे कारण मुंबईवर कोणत्याही एका भाषिकांचे राज्य आता चालवले जाऊ शकणे अशक्य आहे.
बेसिकली, मुंबई हे शहर नसतेच तर इतर शहरे काय निर्माणच झाली नसती? हा प्रतिसाद असंबद्ध नाही. मुंबईत टॅक्सी हा प्रकार व त्याचे चालक ऐतिहासिक आहेत. ते गेल्या दोन पाच वर्षात निर्माण झालेले नाहीत. आज त्यावर विचार करायला लागत आहे कारण कुणीतरी 'मराठी, मराठी' म्हणून बोंबाबोंब करतो.
जो मराठी, मराठी म्हणून ओरडा करतो आहे तो जन्मालाही आला नव्हता तेव्हापासून मुंबईत गुजराथी व इतर परभाषिक आहेत व मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचवेळी मराठी माणसाने बंदर, हॉटेल्स, शेअर बाजार, कारखाने हे व्यवसाय आपल्या हाती घेतले असते तर हा प्रश्न फारसा भेडसावला नसता.
मुख्यमंत्र्यांना काय दोष द्यायचा? त्यांचे कर्तव्यच आहे की जे मत देतात त्यांना आवडेल असे बोलायचे. मराठी माणसांसाठी 'मराठी सक्तीची' अशी बातमी छापायची अन नॉन मराठींसाठी 'इतर भाषाही यायला हव्यात' अशी बातमी छापायची.
साहेब, मराठी माणसाच्या हातातून मुंबई कधीच गेलेली आहे. आता फक्त तेथे मराठी माणसे राहतात म्हणून ही सेना अन ती सेना निर्माण होत राहते. आणि मुंबई मराठी माणसाच्या हातातून गेली आहे याचा इतर कशाहीपेक्षा मला सर्वात जास्त आनंद होतो. याचे कारण 'आपण जे आहोत असे आपण मानतो, ते आपण नाहीच आहोत हे मराठी माणसाला आता कळत आहे'.
धन्यवाद!