मुळात माझेच मत खरे आहे असा विश्वास, आणि ते इतरांनी मान्य करावे असा आग्रह प्रत्येकाचाच असतो. त्यातिल, इतरांना समजावत बसण्याच्या फंदात न पडता जे आपल्या विध्वंसक ताकदीच्या जोरावर मते लादू पाहतात, ते सर्व दहशतवादी. कधी या दहशतीचा आधार धार्मिक ग्रंथात शोधलेला असतो, तर कधी धर्म ही अफुची गोळी आहे असे म्हणणार्या ग्रंथात.
उपरोक्त उपाय धर्मातील साध्या साध्या सुधारणांसाठी चालत नाहीत, तर दहशत थांबवण्यासाठी कसे काय पुरतील? बरे एवढ्या मोठ्याप्रमाणावर धर्मत्याग करायला लोकांना कसे उद्युक्त करणार? की त्यासाठी परत कुणालातरी बंदुका घ्याव्या लागतील?
चांगली आचरणतत्त्व ही कोणत्याही धर्माची मक्तेदारी नाही हे खरेच. पण म्हणून निधर्मी समाज निर्माण होणे शक्य नाही. कारण जगात एकापेक्षा अनेक व्यवस्था असणार. आणि त्या व्यवस्थांना काहीचे साचलेपण, अभिनिवेश, कालौघात येणार. त्यातूनच पुन्हा संघर्ष.
या दहशतवादाला आपण कसे तोंड देणार हाच खरा प्रश्न असतो.