दहशदवाद्यांनी धर्माचा बुरखा पांघरलेला आहे. त्यांना धर्माचा प्रसार करावयाचा नसून धर्माच्या नावाखाली दहशदवादी निर्माण करावयाचे आहेत. तसेच परदेशातून धर्माच्या नावाखाली बक्कळ निधी गोळा केला जातो. त्यामुळे धर्मत्यागाने हे उद्दिष्ट सफल होणार नाही. त्यासाठी दहशदवाद्यांच्या तावडीत सापडणाऱ्या मुलांना अलिप्त करून त्यांच्या शिक्षणाची व नोकरीची व्यवस्था त्या सरकारने/सुधारणावाद्यांनी केली पाहिजे.  जे उच्चशिक्षित युवक ह्यांच्या प्रलोभनांना बळी पडतात त्यांना ह्यापासून परावृत्त केले पाहिजे.

भारतात नक्सली भागात आज नक्सलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम काही संस्था आणि पोलीस दल करत असते, त्यामध्ये त्यांना यशही मिळते. असे प्रयत्न झाले पाहिजेत.

पेज-३ चित्रपटामध्ये शेवटी एक संवाद आहे  "व्यवस्था बदलायची असेल तर त्या व्यवस्थेमध्येच राहावे लागते. "