केवळ धर्म हाच अतिरेक्यांचा मुद्दा नाही आणि नव्हतां. नक्षलवादी वा श्रीलंकेतील तमिळ वाघ यांना धार्मिक मुद्दा नाही. त्यामुळे अतिरेकी प्रवृत्तीचे इतके सोपे विश्लेषण करता येणार नाही. पूर्वी एवढे विचारवंत धर्मसंस्थापक होऊन गेले आणि एका धर्मातील दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी निधर्मी होण्या ऐवजी नवा धर्मच स्थापन करण्याचा निर्णय त्यांना का करावा लागला ? डॉ. बाबासाहेब आंबेडकारांनाही धर्मत्याग करून निधर्मी बनण्याचा पर्याय का सुचला नाही ? धर्म नसला तरी अतिरेक्यांना अनेक विषय मिळतील.