दहशतवाद संपविण्यासाठी धर्मत्याग करणे उपयोगी नाही. त्याने काहीही साध्य होणार नाही, उलट अधिक पेच निर्माण होतील.
हां, जर दहशतवादाचा खातमा करायचा असेल तर त्यासाठी त्यांचे शिक्षण व जागृती हाच एकमेव पर्याय समोर दिसतो. अनेक दहशतवादी हे मिळणाऱ्या पैशापोटी ह्या धंद्यात उतरल्याचे दिसते. जिथे गरीबी, भूक, अशिक्षितता, बेरोजगारी आहे तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील दहशतवाद उफाळणारच! त्यामुळे या लोकांना शिक्षण, जागृती व संवादानेच हाताळता येऊ शकते. मी स्वतः अशा कधीकाळी नक्षलवादी/ दहशतवादी असलेल्या परंतु आता जागृती व आपुलकीने हृदयपरिवर्तन झालेल्या लोकांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकले आहेत. अशी हृदयपरिवर्तने अनेकांची झाली आहेत. त्यांचे अनुभव ऐकल्यावर ते समजून येते.
आता इंटेरनेटमुळे ते तुम्हीही पाहू/ ऐकू शकता. पाहावयाचे झाल्यास हा दुवा :

दुवा क्र. १ 

हा अजून एक दुवा : दुवा क्र. २


तळटीप : हे कार्य अजून विस्ताराने व्हायला हवे.