आपल्या त्यागाचा आणि दहशतवादाचा काही संबंध असावा असे मला तरी वाटत नाही.
पण दहशतवादी मात्र त्यांचे साध्य साधण्यासाठी आत्महत्या करतात,कारण आज तरी त्यांचे हत्यार धर्म आहे, उद्या दुसरे काहीही असेल.
लोकसंख्येचा भस्मासुर, कमालीचे दारिद्र्य, सभोवतालचा समाज व त्याची मानसिकता, बेकारी,
सारासार विवेकबुद्धीचा अभाव आणि अजुन कितीतरी कारणांनी जोपासला जाणारा दहशतवाद
निव्वळ सामुदायिक धर्मत्यागाने नष्ट होणे केवळ अशक्य आहे असे वाटते. भारत आणि शेजारील राष्ट्रांमधील दहशतवाद उपटून काढणे नजिकच्या भविष्यात तरी संभव नाही.