मत्त व उन्मत्त सरकारचे हे लक्षण आहे. जनतेने जे पेरले ते उगवत आहे. कोणतीही मुजोरगिरी, दंडेलशाही, भ्रष्टाचार पोसाल तर त्याची हीच फळे चाखाल! जर कलमाडींच्या नावावर फौजदारी गुन्हा दाखल असताना ते खासदार म्हणून निवडून येऊ शकतात, चटवाल पद्मश्री पटकावू शकतात, राठोड राजरोस वावरू शकतो तर मानकरबुवा म्हणजे किरकोळीतील काम आहे! हं... आता पुनर्प्रवेश झाल्यावर तो अजून मजबूत होईल, अजून भ्रष्टाचार करण्यास मोकळा होईल हे खरे! सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या त्याच्या अटकेचेवेळी बोंबलत होते ते आता गप्प का बसलेत? की त्यांनाही ह्या सर्वातील फोलपणा जाणवू लागलाय? आपण कितीही ओरड केली तरी हे लोक जुमानणार नाहीत अशी त्यांची बहुधा खात्री झाली असावी.