शब्दवेडा येथे हे वाचायला मिळाले:
डान्स क्लास बंद केला म्हणून आत्महत्या, सातवीतल्या मुलाची शाळेत गळफास घेऊन आत्महत्या, परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या... एकापाठोपाठ एक बातम्या येत होत्या, येत आहेत.. आत्महत्यांचं सत्र अजून चालूच आहे. हे सारं बघून, ऐकून मनात एक विचार आला, च्यायला शिक्षणपद्धती, यंत्रणा, मानसिकता, जीवघेणी स्पर्धा, अवाजवी अपेक्षा, ताण या तत्सम गोष्टींवर केस ठोकता येत नाही. तसं झालं असतं तर आजवर अगणित वेळा यांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली असती.