Batmidar येथे हे वाचायला मिळाले:
"सद्यकालीन सामाजिक परिस्थितीचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता पत्रकारिता अधिक जबाबदार होण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. वृत्तपत्रांच्या व विशेषतः दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी या जाणीवेने काम केले पाहिजे, की आपल्या पत्रकारितेने सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण प्रदुषित होणार नाही. या जबाबदारीचे भान त्यांनी न बाळगल्यास भावी पिढ्या त्यांस कदापि माफ करणार नाहीत. निदान कविवर्य मंगेश पाडगावकर तर त्यांस कधीही क्षमा करणार नाहीत...."